सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तुळशी पाने मिसळून पिण्याचे 5 फायदे

पूर्वीपासून आपल्या इथे तुळशीच्या झाडाला देवाचा दर्जा दिला जातो. तुळशीची पूजा केली जाते. आपल्या घरात हि आपण बघितल असेल कि जुने लोक गळ्यात तुळशीची माळ घालायचे. इतक महत्व आपल्या पूर्वजांनी तुळशीच्या झाडाला दिल होत.

त्यांना तुळशीच्या झाडाच महत्व माहित होत. परंतु आजकालच्या आपल्या पिढीला तुळशीच्या झाडाचे औषधी गुणधर्म हि माहित नसतील. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीच्या पानाचे आरोग्यासाठी असणारे अनेक फायदे

सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने कोमट पाण्यासोबत घेतल्याने आपल्या शरीरात अन्नामधून गेलेले विषारी घटक जे आपल्या किडनी, आतडे आणि रक्तामध्ये जमा होत असतात ते  बाहेर काढण्यास मदत होते. तुळशीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट पाचन तंत्र आणि मूत्रपिंड निरोगी ठेवतात, त्यांची कार्यक्षमता वाढवतात.

रिकाम्या पोटी तुळशीची पाने कोमट पाण्यासोबत घेतल्याने आपल्याला असणारी सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा गोष्टी हि कमी व्हायला मदत मिळते. कोमट पाण्यात तुळशीची पाने मिसळून प्यायल्याने श्वसनाच्या समस्या आणि दम्यासारख्या आजारांपासूनही आराम मिळतो.

कोमट पाण्यात तुळशीची पाने मिसळून प्यायल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्याचबरोबर रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यास मदत होते.

ज्या स्त्रियांना अनियमित मा’सिकपाळीचा त्रास असेल त्यांनी नियमित सकाळी आणि रात्री झोपण्याआधी थोडेसे तुळशीचे बी चावून खा. असे केल्याने मासिकपाळीमधील अनियमितता दूर होईल.

आपल्याला सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तुळशी पाने मिसळून प्यायल्याने मिळणारे फायदे  हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page