नवरात्रीचे नऊ दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जातात. ह्या नऊ दिवसांमध्ये बऱ्याचश्या महिला उपवास करतात. नवरात्रीमध्ये सात्त्विक आहार आणि सात्त्विक दिनचर्येचे पालन केले जाते. नवरात्रीमध्ये उपवास केल्याने आपले शरीर डिटॉक्स व्हायला मदत मिळते.
जर आपल्याला उपवास करायला जमणार नसेल तर ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊयात. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शक्य असल्यास यामध्ये गहू, तांदूळ, नाचणी, बाजरीचे पीठ, रवा, बेसन, मक्याचे पीठ ह्या धान्याचे सेवन करू नये.
नवरात्रीमध्ये साध्या मीठाऐवजी सैंधव मीठाचा वापर करावा. सैंधव मीठात सोडियमचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी सैंधव मीठ खूप फायदेशीर असते.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत लसूण आणि कांदा खाण्यास सक्त मनाई आहे. नवरात्रीच्या काळात दा’रू, मांसाहार आणि अंडी खाण्यास पूर्णपणे बंदी आहे. या सर्व गोष्टींपासून दूर राहिल्यास शरीरातील विषारी द्रव्ये नऊ दिवसांत कमी व्हायला मदत मिळते.
नवरात्रीच्या काळात आपण रताळे, बटाटा, शेंगदाणे, साबुदाना, शिंगाडा, केळी, सफरचंद, संत्री, सीताफळ, पेरू, डाळिंब, पपई यासारखी फळ तसेच दूध, दही, काजू, पिस्ता, मनुका, अक्रोड, खजूर यांसारखी ड्रायफ्रुट्स खाऊ शकता.
आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणकोणते खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे